तं निगृह्य खलं पूर्वं कुर्यात् सर्पावरोधनम्॥
अर्थ : जर व्यासपीठावर (दुष्ट माणूस खूप महत्त्वाची) सूत्रे हलवत असेल तर गारुडी हा (मुख्य सूत्रधार) कारण आहे. त्या दुष्टाला पहिल्यांदा ताब्यात घेऊन मग सापाला निर्बंध घालावेत.
दुष्ट माणूस - सर्प
ह्या संस्कृत सुभाषितांचा अर्थ सौ. मंगला केळकर यांनी समजावून सांगितला आहे.
तं निगृह्य खलं पूर्वं कुर्यात् सर्पावरोधनम्॥
अर्थ : जर व्यासपीठावर (दुष्ट माणूस खूप महत्त्वाची) सूत्रे हलवत असेल तर गारुडी हा (मुख्य सूत्रधार) कारण आहे. त्या दुष्टाला पहिल्यांदा ताब्यात घेऊन मग सापाला निर्बंध घालावेत.
दुष्ट माणूस - सर्प
संसारसागरे दु:खं तस्माज्जागृहि जागृहि॥
संसार रूपी समुद्रात (प्रत्येकाला) जन्माच्या वेळी, म्हातारपणी (वेगवेगळ्या दुखण्यामुळे) दु:ख असे सारखे दु:खच भोगावे लागते.म्हणून, जागा हो. जागा हो.(आणि मोक्षप्राप्तीचा प्रयत्न कर)
अपारकरुणापूरतरङ्गितदृशे नमः ॥
विघ्नरूपी अंध:काराचा नाश करणारा, व करुणारूपी अथांग जलराशींनी भरलेल्या डोळ्यांचा [असा] गणपती नावाच्या प्रकाशाला माझा नमस्कार असो.
नापतिः सुखमेधेत या स्यादपि शतात्मजा ॥
ज्याप्रमाणे एक वीणा तारे शिवाय आणि रथ चाका शिवाय चालवता येत नाही, त्याच प्रमाणे एक स्त्री तिच्या पती शिवाय सुखी राहू शकत नाही, जरी तिला शंभर पुत्र असतील तरीही
राघवं शोभयन्त्येते षड्गुणाः पुरुषोत्तमम् ||
दयाळूपणा, करुणा, विद्वत्ता, सत्चरित्रता, आत्मसंयम, शांत स्वभाव, हे सहा गुण नेहमी भगवान रामाला सुशोभित करतात.
सत्यं वदेद् व्याहृतं तत् द्वितीयम् ।
प्रियं वदेद् व्याहृतं तत् तृतीयं
धर्मं वदेद् व्याहृतं तच्चतुर्थम् ॥
बोलण्यापेक्षा न बोलण हेच चांगलं सांगितलं आहे. [बोलणं वाणीचं प्रथम वैशिष्ट्य आहे आणि जर बोलावं लागलं तर] खरं बोलणं हे वाणीचं दुसरं वैशिष्ट्य आहे, म्हणजे मौनाची अपेक्षा पण अधिक लाभदायक आहे. [सत्य आणि] प्रिय बोलणं वाणीचे तिसरे वैशिष्ट्य आहे. [जर सत्य, प्रिय] यांच्या बरोबर जर धर्म संम्मत बोलणे ही वाणीची चौथी विशेषता आहे. [यांच्यामध्ये उत्तरोत्तर श्रेष्ठता आहे.
न क्रुद्ध: परूषं ब्रूयात् स वै साधूत्तम: स्मॄत:॥
जो माणूस सन्मान केल्यावर आनंदी होत नाही आणि अपमान केल्यावर त्याला राग येत नाही, व राग आला तरी कठोर बोलत नाही, त्यालाच सज्जन माणसांमध्ये श्रेष्ठ म्हणतात.