भाषासु मुख्या मधुरा दिव्या गीर्वाण भारती।
तस्यां हि काव्यं मधुरं तस्मादपि सुभाषितम्॥

Tuesday, October 18, 2011

४७७. बन्धनानि किल सन्ति बहूनि ; प्रेमरज्जुमयबन्धनमाहु: |

दारुभेदनिपुणोऽपि षडङ्घ्रि: निष्क्रियो भवति पङ्कजकोषे ||

अर्थ

बंधन तर बरीच [बऱ्याच प्रकारची] असतात. पण प्रेमाच्या धाग्यांच बन्धन [तोडण्यास सर्वात कठीण] असे सांगतात. [असे पहा कि] लाकडे पोखारण्यात निष्णात अश्या भुंग्याला देखील [अतिशय कोमल असूनही] कमळाच्या पाकळ्या [कुरतडून बाहेर पडण्यास असमर्थ ठरतो] निष्क्रीय बनवतात. [भुंगा मध खायला गेल्यावर सूर्यास्त झाला तर कमळ मिटत आणि तो आत अडकतो.]

2 comments:

Unknown said...

हे सुभाषित कोणाचे आहे. म्हणजे कर्ता कोण?

प्रदीप said...

चाणक्यनीति