भाषासु मुख्या मधुरा दिव्या गीर्वाण भारती।
तस्यां हि काव्यं मधुरं तस्मादपि सुभाषितम्॥

Friday, August 23, 2013

१०८६. काष्ठादग्निर्जायते मथ्यमानाद्भूमिस्तोयं खन्यमाना ददाति |

सोत्साहानां नास्त्यसाध्यं नराणां मार्गारब्धाः सर्वयत्नाः फलन्ति ||

अर्थ

लाकडे एकामेकावर घासल्यामुळे अग्नि उत्पन्न होतो. [खरं म्हणजे हे फार कठीण काम आहे पण प्रयत्नपूर्वक सतत करत राहिल्यास यश मिळत.] जमीन खणत राहिल्याने [खूप काळाने का होईना] पाणी लागत. उत्साही लोकांना अशक्य असे काही नाही. [योग्य रीतीने] प्रयत्न केल्यावर ते फलद्रूप होतातच.

No comments: