भाषासु मुख्या मधुरा दिव्या गीर्वाण भारती।
तस्यां हि काव्यं मधुरं तस्मादपि सुभाषितम्॥

Wednesday, September 11, 2013

११००. जेतुं यस्त्रिपुरं हरेण हरिणा व्याजाद्बलिं बध्नता स्रष्टुं वारिभवोद्भवेन भुवनं शेषेण धर्तुं धराम् |

पार्वत्या महिषासुरप्रमथने सिद्धाधिपैः सिद्धये ध्यातः पञ्चशरेण विश्वजितये पायात्स नागाननः ||

अर्थ

[विजय मिळावा; विघ्न येऊ नयेत म्हणून ज्या गजमुखाच] त्रिपुरासुराच्या तीन पुरांचा नाश करण्यासाठी भगवान शंकरांनी; याचनेच्या मिषाने बळीला पकडण्यासाठी श्रीविष्णूनी; जगताची निर्मिती करण्यासाठी ब्रह्मदेवाने; शेषाने पृथ्वीचा [भार घेण्याची ताकद यावी] म्हणून; महिषासुराचा वध करण्याच्यावेळी जगदंबेने; सिद्धी प्राप्त करण्यासाठी सिद्धानी; सर्व विश्व पादाक्रांत करण्यासाठी मदनाने ज्याचं मनात चिंतन केलं तो गजमुख [जशा त्यांच्या इच्छा त्यांनी पूर्ण केल्या तशा आमच्या पण पूर्ण करून आमचे] रक्षण करो.

No comments: