भाषासु मुख्या मधुरा दिव्या गीर्वाण भारती।
तस्यां हि काव्यं मधुरं तस्मादपि सुभाषितम्॥

Tuesday, November 25, 2014

१३७०. आक्रान्तं मरणेन जन्म जरया यात्युल्बणं यौवनं संतोषो धनलिप्सया शमसुखं प्रौढाङ्गनाविभ्रमैः |

लोकैर्मत्सरिभिर्गुणा वनभुवो व्यालैर्नृपा दुर्जनैरस्थैर्येण विपत्तयोऽप्युपहता ग्रस्तं न किं केन वा ||

अर्थ

आयुष्यावर मृत्युनी आक्रमण केलाय [संपवतो] बेफाम [जोश असणार] तारुण्य म्हातारपणानी संपत. संपत्तीच्या हव्यासानि समाधान नाहीस होत.नखऱ्यांकडे लक्ष जाऊन शांती मावळते. मत्सर करणाऱ्या लोकांमुळे गुणांच चीज होत नाही. अरण्यावर सापांच आक्रमण होतं. दुष्ट लोक राजांवर प्रभुत्व मिळवतात. संकटावर अस्थैर्याचे आक्रमण होत. [एकूण काय] कुठलीही गोष्ट कशानितरी संपतेच. [सर्व स्थितींना नाश आहे.]

No comments: