भाषासु मुख्या मधुरा दिव्या गीर्वाण भारती।
तस्यां हि काव्यं मधुरं तस्मादपि सुभाषितम्॥

Thursday, November 20, 2014

१३६९. श्रुतिः शिथिलतां गता स्मृतिरपि प्रनाष्टाधुना गतिर्विषयमागता विगलिता द्विजानां ततिः |

गवामपि च संहतिः समुचितक्रियातश्च्युता कृता नु जरया तया कलियुगस्य साधर्म्यता ||

अर्थ

श्रुति [कान आणि वेदांच ज्ञान] मंदावल आहे; आता स्मृति [ते ग्रंथ आणि आठवण] नाश पावली आहे; गति [परलोक आणि चालणं] विषय [ऐहिक इच्छा किंवा जरुरी] एवढीच राहिली आहे; द्विजांची [ज्ञानी माणसे किंवा  दात] रांग नाहीशी झालीय; गो [इंद्रिय आणि गाई] चा समुदाय त्याचं काम करत नाहीये, खरोखर म्हातारपण अगदी कलियुगासारख वागतंय!

No comments: