भाषासु मुख्या मधुरा दिव्या गीर्वाण भारती।
तस्यां हि काव्यं मधुरं तस्मादपि सुभाषितम्॥

Tuesday, August 9, 2022

१४०३. न त्वमात्मानं बहु विगणयन्नात्मनैवावलम्बे ।

तत्कल्याणित्वमपि नितरां मा गमः कातरत्वम् ||

कस्यैकान्तं सुखम् उपनतं, दु:खम् एकान्ततो वा। 

नीचैर् गच्छति उपरि च, दशा चक्रनेमिक्रमेण॥ [२/४९ मेघदूत कालिदास]


अर्थ

हे ( माझ्या) नशीबवान (प्रिये) तू याबद्दल खूप भिऊन जाऊ नकोस. मी स्वतः ला सावरीन. फक्त सुख एके सुख असे कोणाला मिळत? रहाट गाडग्याप्रमाणे ही स्थिती वर खाली फिरत रहाते.

Monday, August 8, 2022

१४०२. करारविन्देन पदारविन्दं मुखारविन्दे विनिवेशयन्तम् |

वटस्य पत्रस्य पुटेशयानं बालं मुकुन्दं मनसा स्मरामि ||

अर्थ

हस्त कमलाने चरणकमल मुखकमलामध्ये घालणाऱ्या, वडाच्या पर्णावर शयन करणाऱ्या, छोट्याशा भगवान श्रीकृष्णाचे मी मनापासून स्मरण / मनामध्ये स्मरण करतो/ते.

Wednesday, July 13, 2022

१४०१. पूर्णे तटाके तृषितः सदैव भूतेपि गेहे क्षुधितः स मूढः ।

पूर्णे तटाके तृषितः सदैव भूतेपि गेहे क्षुधितः स मूढः ।
कल्पद्रुमे सत्यपि वै दरिद्रः गुर्वादियोगेऽपि हि यः प्रमादी ॥

सद्गुरु ची भेट होऊन सुद्धा जो चुका करतो तो ( शिष्य) तळेपूर्ण भरलेले असूनही कायम तहानलेला असतो, स्वतःचे घर असूनही भुकेजलेला, व कल्पवृक्ष मालकीचा असूनही गरीबच असतो.

Monday, March 8, 2021

१४०० : ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम्।

उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीय मामृतात्॥

(  आम्ही सर्वत्र ज्याचा) गंध (दरवळत असतो अशा, तब्येत) सुदृढ करणार्‍या तीन नेत्र असलेल्या भगवान शंकरासाठी यज्ञ करतो. ( त्याची भक्ती करतो.) त्यांनी उंबराच्या फळा प्रमाणे आम्हाला मृत्यू पासून सोडवावे मोक्षा पासून नको. ऋषी ना अपमृत्यु असेल तर त्यापासून सुटका हवी आहे. उंबराच फळाला देठाचा काही भाग रहात नाही. आणि अगदी सहज ते गळत. तस घडाव.

Tuesday, February 9, 2021

१३९९. दाददो दुद्ददुद्दादी दाददो दूददीददोः।

दुद्दादं दददे दुद्दे दादाददददोऽददः॥
 

अर्थात 

श्री कृष्ण, प्रत्येकास वरदान देणारा, दुराचारी माणसाचा छळ करणारा‌ व त्यांना शुद्ध करणारा, जो आपल्या हातांनी दुसऱ्यांना त्रास देणाऱ्या दुराचारी लोकांचा नाश करू शकतो. त्या कृष्णाने शत्रूवर आपले वेदनादायक बाण मारले!

माघ कवींनी केलेली कृष्ण स्तुती 

साभार : विश्वंभर मुळे (गोंदीकर)

१३९८. विकाशमीयुर्जगतीशमार्गणा विकाशमीयुर्जगतीशमार्गणाः।

विकाशमीयुर्जगतीशमार्गणा विकाशमीयुर्जगतीशमार्गणाः॥


अर्थ 

अर्जुनाचे बाण सर्वत्र व्याप्त झाले आहेत. ज्यामुळे शंकरांचे बाण खंडित झाले आहेत. ह्याप्रकारे अर्जुनाचे रणकौशल पाहून दानवांचा पराभव करणारे शंकरांचे गण आश्चर्यचकित झाले आहेत. शंकर आणि तपस्वी अर्जुनाचे युद्ध पाहण्यासाठी शंकरांचे भक्त आकाशात आले आहेत. 

महायमक अलंकरातील एक श्लोक आहे. ह्याचे चारही पद सारखे आहेत पण प्रत्येक पदाचा अर्थ भिन्न आहे. 

१३९७. न नोननुन्नो नुन्नोनो नाना नाना नना ननु।

नुन्नोSनुन्नो ननुन्नेनो नानेना नन्नुनन्नुनुत्।।


अर्थ 

जो मनुष्य युध्दात आपल्यापेक्षा दुर्बलाकडून घायाळ होतो तो खरा मनुष्य नाहीये, जो आपल्यापेक्षा दुर्बलांना घायाळ करतो तो ही खरं मनुष्य नाही ये, ज्या मनुष्याचा स्वामी घायाळ नाही ये तो घायाळ नाहीये आणि घायाळ मनुष्याला घायाळ करणारा खरा मनुष्य नाहीये. 

'किरातार्जुनीयम्' ह्या काव्य संग्रहात महाकवी 'भारवि' ह्यांनी केवळ 'न' चा वापर करून श्लोक तयार केला आहे.