भाषासु मुख्या मधुरा दिव्या गीर्वाण भारती।
तस्यां हि काव्यं मधुरं तस्मादपि सुभाषितम्॥

Monday, April 18, 2011

३३६. गुर्वर्थे त्यक्तराज्यो व्यचरदनुवनं पद्मपद्भ्यां प्रियायाः पाणिस्पर्शाक्षमाभ्यां मृजितपथरुजो यो हरीन्द्रानुजाभ्याम् |

वैरूप्याच्छूर्पंणख्याः प्रियविरहरुषाऽऽरोपितभ्रूविजॄम्भत्रस्ताब्धिर्बिद्धसेतुः खलदवदहनः कोसलेन्द्रोऽवतान्नः ||

अर्थ

वडिलांसाठी ज्याने राज्याचा त्याग केला, लाडक्या पत्नीला [पळवल्यानंतर] हनुमान आणि लक्ष्मण यांच्यासह कमलाप्रमाणे कोमल असे चरण असूनही जो वनात भटकत राहिला, शूर्पणखेला विद्रूप केलं, प्रियेच्या विरहामुळे रागावलेल्या ज्याने [क्रोधाने] भुवया वक्र केल्यामुळे घाबरलेल्या समुद्रावर ज्याने पूल बांधला, राक्षससेना रूपी वणव्यालाच जाळून टाकलं तो कोसलदेशचा राजा [प्रभू रामचंद्र ] आमचे रक्षण करो.

No comments: