भाषासु मुख्या मधुरा दिव्या गीर्वाण भारती।
तस्यां हि काव्यं मधुरं तस्मादपि सुभाषितम्॥

Saturday, May 24, 2014

१२७८. सर्वेन्द्रियाणि संयम्य बकवत्पतितो जनः |

कालदेशोपपन्नानि सर्वकार्याणि साधयेत् ||

अर्थ

आपल्या सर्व इंद्रियांवर ताबा ठेवून माणसाने त्या त्या वेळी आणि त्या त्या ठिकाणी जसं वागणं योग्य आहे तसा व्यवहार ठेऊन आपली काम साधून घ्यावी. [मासे पकडण्यासाठी बगळा जसा तासनतास एका पायावर चित्रासारखा उभा राहतो, सगळं व्यवधान तिकडे लावतो तसं.]

No comments: