भाषासु मुख्या मधुरा दिव्या गीर्वाण भारती।
तस्यां हि काव्यं मधुरं तस्मादपि सुभाषितम्॥

Wednesday, March 19, 2025

१४०६. आलस्यं हि मनुष्याणां शरीरस्थो महान् रिपुः।

नास्त्युद्यमसमो बन्धुः कृत्वा यं नावसीदति।।

आळशीपणा हा माणसाचा शरीरातला सर्वात मोठा शत्रु आहे व माणसाचा सर्वात मोठा मित्र परिश्रम हा आहे. याची कास धरल्यास (कोणाचाही) नाश होत नाही.

Tuesday, March 18, 2025

१४०५. व्यायामात् लभते स्वास्थ्यं दीर्घायुष्यं बलं सुखम्।

आरोग्यं परमं भाग्यं स्वास्थ्यं सर्वार्थसाधनम्॥

[नियमित] व्यायामामुळे स्वास्थ्य, दीर्घायुष्य, बल आणि सुख यांची प्राप्ति होते. निरोगी असणे हे परम भाग्य आहे आणि [चांगल्या] स्वास्थ्यामुळे सर्व कार्य सिद्धिस जातात.

Monday, March 17, 2025

१४०४. क्रोधमूलो मनस्तापः क्रोधः संसारबन्धनम्।

धर्मक्षयकरः क्रोधः तस्मात्क्रोधं परित्यज॥

क्रोध हा मनाच्या दुखा:चे प्राथमिक कारण आहे. संसार बन्धनाचे कारण असतो. क्रोध हा धर्माचा नाश करणार असतो. त्यामुळे [माणसाने] क्रोधाचा निरंतर त्याग करावा.


Tuesday, August 9, 2022

१४०३. न त्वमात्मानं बहु विगणयन्नात्मनैवावलम्बे ।

तत्कल्याणित्वमपि नितरां मा गमः कातरत्वम् ||

कस्यैकान्तं सुखम् उपनतं, दु:खम् एकान्ततो वा। 

नीचैर् गच्छति उपरि च, दशा चक्रनेमिक्रमेण॥ [२/४९ मेघदूत कालिदास]


अर्थ

हे ( माझ्या) नशीबवान (प्रिये) तू याबद्दल खूप भिऊन जाऊ नकोस. मी स्वतः ला सावरीन. फक्त सुख एके सुख असे कोणाला मिळत? रहाट गाडग्याप्रमाणे ही स्थिती वर खाली फिरत रहाते.

Monday, August 8, 2022

१४०२. करारविन्देन पदारविन्दं मुखारविन्दे विनिवेशयन्तम् |

वटस्य पत्रस्य पुटेशयानं बालं मुकुन्दं मनसा स्मरामि ||

अर्थ

हस्त कमलाने चरणकमल मुखकमलामध्ये घालणाऱ्या, वडाच्या पर्णावर शयन करणाऱ्या, छोट्याशा भगवान श्रीकृष्णाचे मी मनापासून स्मरण / मनामध्ये स्मरण करतो/ते.

Wednesday, July 13, 2022

१४०१. पूर्णे तटाके तृषितः सदैव भूतेपि गेहे क्षुधितः स मूढः ।

पूर्णे तटाके तृषितः सदैव भूतेपि गेहे क्षुधितः स मूढः ।
कल्पद्रुमे सत्यपि वै दरिद्रः गुर्वादियोगेऽपि हि यः प्रमादी ॥

सद्गुरु ची भेट होऊन सुद्धा जो चुका करतो तो ( शिष्य) तळेपूर्ण भरलेले असूनही कायम तहानलेला असतो, स्वतःचे घर असूनही भुकेजलेला, व कल्पवृक्ष मालकीचा असूनही गरीबच असतो.

Monday, March 8, 2021

१४०० : ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम्।

उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीय मामृतात्॥

(  आम्ही सर्वत्र ज्याचा) गंध (दरवळत असतो अशा, तब्येत) सुदृढ करणार्‍या तीन नेत्र असलेल्या भगवान शंकरासाठी यज्ञ करतो. ( त्याची भक्ती करतो.) त्यांनी उंबराच्या फळा प्रमाणे आम्हाला मृत्यू पासून सोडवावे मोक्षा पासून नको. ऋषी ना अपमृत्यु असेल तर त्यापासून सुटका हवी आहे. उंबराच फळाला देठाचा काही भाग रहात नाही. आणि अगदी सहज ते गळत. तस घडाव.