भाषासु मुख्या मधुरा दिव्या गीर्वाण भारती।
तस्यां हि काव्यं मधुरं तस्मादपि सुभाषितम्॥

Sunday, July 18, 2010

२३१. पुरा कवीनां गणनाप्रसङ्गे कनिष्ठिकाधिष्ठितकालिदासा |

तथापि तत्तूल्यकवेरभावादनामिका सार्थवती बभूव ||

अर्थ

पूर्वी कवींची मोजदाद करण्याच्या वेळी करंगळी [वर पहिलं नाव] कालिदास [हे] घेऊन मोजलं. पण पुढे त्याच्या तोडीचा कवि न सापडल्याने अनामिका [जिच्यासाठी नाव नाही अशी] सार्थ नावाची झाली. [कालिदासाची अद्वितीयता सांगण्यासाठी नेहमी हा श्लोक उद्धृत करतात]

कालिदासाच्या स्मृती निमित्त हा श्लोक.

No comments: