भाषासु मुख्या मधुरा दिव्या गीर्वाण भारती।
तस्यां हि काव्यं मधुरं तस्मादपि सुभाषितम्॥

Friday, November 14, 2014

१३६८. आलस्यं स्थिरतामुपैति भजते चापल्यमुद्योगितां मूकत्वं मितभाषितां वितनुते मौढ्यं भवेदार्जवम् |

पात्रापात्रविचारणाविरहिता यच्छत्युदारात्मतां मातर्लक्ष्मि तव प्रसादवशतो दोषा अमी स्युर्गुणाः ||

अर्थ

अहो आईसाहेब लक्ष्मीदेवी; आपल्या कृपाप्रसादाने [ज्यांच्या घरी आपण वास्तव्य करता त्यांचा] आळशीपणाला स्थैर्य असा मान मिळतो; [घिसाड] घाई उद्योगीपणा होतो; बोलता न येणं मितभाषी असं नाव मिळवत; मूर्खपणा सरलता बनते आणि [दुसऱ्याची] पात्रता न समजणं म्हणजे 'तो उदार आहे' असा सन्मान मिळवून देत.

No comments: