भाषासु मुख्या मधुरा दिव्या गीर्वाण भारती।
तस्यां हि काव्यं मधुरं तस्मादपि सुभाषितम्॥

Monday, May 16, 2011

३४८. कुक्षेर्भागद्वयं भोज्यैस्तृतीये वारि पूरयेत् |

वायोः संचारणार्थाय चतुर्थमवशेषयेत् ||

अर्थ = जठराचे चार भाग कल्पून त्यापैकी दोन भाग अन्नाने भरावेत; तिसरा पाण्याने भरावा आणि वायु संचारणासाठी चवथा भाग मोकळा ठेवावा.

३४७. जातमात्रश्चिकित्स्यः स्यान्नोपेक्ष्योऽल्पतया गदः |

वह्निशत्रुविषैस्तुल्यः स्वल्पोऽपि विकरोत्यसौ ||

अर्थ

रोग झाला रे झाला कि त्यावर लगेच उपचार करावे; त्याची हेळसांड करू नये. नाहीतर अग्नि, शत्रू आणि विष यांप्रमाणे तो वाढत वाढत जाऊन अक्राळविक्राळ स्वरूप धारण करतो व असाध्य बनतो.

Tuesday, May 10, 2011

३४६. बोद्धारो मत्सरग्रस्ताः प्रभवः स्मयदुषिताः |

अबोधोपहताश्चान्ये जीर्णमङ्गे सुभाषितम् || नीतिशतक राजा भर्तृहरि

अर्थ

सुवचनांचा [कोणालाच उपयोग न होता ती ] स्वतःच्या ठिकाणीच गलीतगात्र होऊन जातात [कारण ] ज्ञानी लोकांना [एकमेकांचा ] मत्सर असतो [ते सुभाषितांची चर्चा करत नाहीत ]; सत्ताधारी लोकांना माजाची बाधा असते [ते कोणाला सुविचाराबद्दल चौकशी करत नाहीत ]उरलेल्या लोकांना काही ज्ञान नसल्याने त्यांना सुवचनांचा पत्ताच नसतो [त्यामुळे हे सर्व ज्ञान वाया जातं ]

३४५. कौपीनं; भस्मनां लेपो ; दर्भा ; रुद्राक्षमालिका |

मौनमेकान्तिका चेति मूर्खसंजीवनानि षट् ||

अर्थ

भगवी कफनी, भस्माचे पट्टे, दर्भ, रुद्राक्षांची माळ, मौन आणि एकटेच राहणे या सहा गोष्टी मूर्ख माणसाला संजीवन देणाऱ्या आहेत. [त्यांच्या आधारावर तो जगतो]

३४४. किं कूर्मस्य भरव्यथा न वपुषि, क्ष्मां न क्षिपत्येष यत् किं वा नास्ति परिश्रमो दिनपतेरास्ते न यन्निश्चलः |

किंत्वंगीकृतमुत्सृजन्कृपणवत् श्लाघ्यो जनो लज्जते निर्वाहः प्रतिपन्नवस्तुषु सतामेतद्धि गोत्रव्रतम् ||

अर्थ

कूर्म हा पाठीवरून पृथ्वीच ओझं ढकलून देत नाही म्हणजे काय ते त्याला जड वाटत नसेल? सूर्य कधीच थांबत नाही तर त्याला काय थकवा येत नसेल? खरं तर एकदा सुरु केलेलं काम क्षुद्रपणे मधेच सोडून द्यायला थोर लोकांना संकोच वाटतो [व] हाती घेतलं ते तडीस लावणं हे थोरांच कुलव्रतच असत.

[निर्वाहः प्रतिपन्नवस्तुषु - हे सर परशुरामभाऊ महाविद्यालयाच ब्रीदवाक्य आहे.]

Sunday, May 1, 2011

३४३. कुर्वन्नपि व्यलीकानि यः प्रियः प्रिय एव सः |

अशेषदोषदुष्टोऽपि कायः कस्य न वल्लभः ||

अर्थ

कितीही चुका, अप्रिय गोष्टी केल्या तरी जे आपल्याला आवडत ते लाडक असतंच, ते कधीही नावडत होत नाही. सगळ्या दोषांनी गच्च भरलेला [स्वतःचा] देह कोणाला बरे आवडत नाही?

३४२. न भृत्यपक्षपाती स्यात्प्रजापक्षं समाश्रयेत् |

प्रजाशतेन संदिष्टं संत्यजेदधिकारिणम् ||

अर्थ

राजाने कधी नोकराची बाजू घेऊ नये, प्रजेची बाजू घ्यावी. शंभर प्रजाजन सांगत असतील तर त्या अधिकाऱ्याचा राजाने सत्वर त्याग करावा.