भाषासु मुख्या मधुरा दिव्या गीर्वाण भारती।
तस्यां हि काव्यं मधुरं तस्मादपि सुभाषितम्॥

Monday, June 20, 2011

३७७. सर्पा: पिबन्ति पवनं न च दुर्बलास्ते शुष्कैः तृणैः वनगजा बलिनो भवन्ति |

कन्दैः फलैः मुनिवरा क्षपयन्ति कालं सन्तोष एव पुरुषस्य परं निधानम् ||

अर्थ

साप [फक्त] वारा पिऊन जगतात, तरीही ते दुबळे नसतात. वाळलेल्या गवताने रानटी हत्ती बलवान होतात. कंदमुळे; फळे खाऊन ॠषीवर्य काल घालवतात. समाधान हाच माणसाचा खरा [श्रेष्ठ] ठेवा आहे [हव्यासाच्या पाठीमागे लागून आयुष्य दु:खी करण्यापेक्षा आहे त्यात आनंदी राहण्यास शिकावे.

No comments: