भाषासु मुख्या मधुरा दिव्या गीर्वाण भारती।
तस्यां हि काव्यं मधुरं तस्मादपि सुभाषितम्॥

Saturday, October 26, 2013

११२५. गृह्णन्तुसर्वे यदि वा यथेष्टं नास्ति क्षति: क्वापि कवीश्वराणाम् |

रत्नेषु लुप्तेषु बहुष्वमर्त्यैरद्यापि रत्नाकर एव सिन्धुः ||

अर्थ

जर आवडत असेल तर [आपली वाङ्गमय रत्न] सगळे जण हव्वी तेवढी घेवोत; श्रेष्ठ कविना [त्याची काहीच चिन्ता नसते] त्यात त्यांच काही नुकसान होत नाही. देवांनी [समुद्रमंथनाच्या वेळी खूप रत्न] पळवली तरी अजूनही सागर हा रत्नाकर - रत्नांचा खजिना आहेच. [प्रतिभावान कवींच अप्रतिम सारस्वत वाचून रसिकांनी मनसोक्त आनंद लुटला तरी त्या कलाकृतींच सौंदर्य कधीच कमी होत नाही हे या वाङ्गमय संपत्तीच वैशिष्ठ्य आहे.]

No comments: