भाषासु मुख्या मधुरा दिव्या गीर्वाण भारती।
तस्यां हि काव्यं मधुरं तस्मादपि सुभाषितम्॥

Sunday, August 8, 2010

२५३. सन्तश्च लुब्धाश्च महर्षिसंघा विप्राः कृषिस्थाः खलु माननीयाः |

किं किं सामिच्छन्ति तथैव सर्वे नेच्छन्ति किं माधवदाघयानम् ||

चित्रकाव्याच्या विविधप्रकारापैकी ' अन्तरालाप ' नावाचा एक चमत्कृतिपूर्ण काव्यप्रकार आहे. अन्तरालापाच्या एकच श्लोकात प्रश्न व त्या प्रश्नांची दडलेली उत्तरे असतात. प्रस्तुत श्लोकात सज्जन, लोभी, ऋषीसमूह, ब्राह्मण, शेतकरी आणि मान्यवर हे सहाजण कशाची इच्छा करतात? असा एक प्रश्न आणि या सहाहि जणांना नको वाटणारी एकच गोष्ट कोणती? असा दुसरा प्रश्न विचारला आहे.

No comments: