भाषासु मुख्या मधुरा दिव्या गीर्वाण भारती।
तस्यां हि काव्यं मधुरं तस्मादपि सुभाषितम्॥

Monday, May 13, 2013

१००९. धनानि भूमौ पशवश्च गोष्ठे भार्या गृहद्वारि जन: श्मशाने |

देहश्चितायां परलोकमार्गे कर्मानुगो गच्छति जीव एक: ||

अर्थ

[आयुष्यभर मिळवलेल सारं धन आपण मेल्यावर सोबत घेऊन जाता येत नाही] ते जिथे ठेवलं आहे तिथेच - जमिनीवर - रहात प्राणी गोठ्यात राहतात. बायको दारापाशीच थांबते. नातेवाईक स्मशानापर्यंत येतात. आपलं शरीर [स्वतःच सुद्धा] चितेवर जळून जात [ते सुद्धा पुढे येत नाही] आणि आपली भलीबुरी कर्म घेऊन जीवाला एकट्यालाच परलोकी  जावे लागते.

No comments: