भाषासु मुख्या मधुरा दिव्या गीर्वाण भारती।
तस्यां हि काव्यं मधुरं तस्मादपि सुभाषितम्॥

Friday, November 4, 2011

४९१. न कामयेऽहं गतिमीश्वारात् परामष्टर्द्धियुक्तामपुनर्भवं वा |

आर्तिं प्रपद्येऽखिलदेहभाजामन्त:स्थितो येन भवन्त्यदु:खा: || भागवत ९ स्कंध २१ वा अध्याय

रन्तिदेव राजाची परिक्षा घेण्यासाठी ब्रह्मा; विष्णु महेश येतात. खूप दिवसाचा तो उपाशी असताना, [४८ दिवस तो उपाशी आहे] अन्न मिळाल्यावर एक ब्राह्मण येतो. तो खाऊन गेल्यावर, एक वृषल येतो. उरलेल्या मधून तो त्याला अन्न देतो. मग एक हरिजन कुत्री घेऊन येतो. मग पाणीच फक्त उरत ते अंत्यजाला देऊन रन्तिदेव हा श्लोक म्हणतो.

अर्थ

मी परमेश्वराकडे स्वर्गात ऎश्वर्यसंपन्न असे स्थान मिळवण्याची इच्छा किंवा मोक्ष सुद्धा मागत नाही. प्राणिमात्राच्या देहात वास करणाऱ्या आत्म्याचे दु:ख नाहीसे व्हावे म्हणून मी त्याला शरण जातो.

No comments: