भाषासु मुख्या मधुरा दिव्या गीर्वाण भारती।
तस्यां हि काव्यं मधुरं तस्मादपि सुभाषितम्॥

Thursday, August 30, 2012

७७०. गुणानामुत्कर्षाच्चरणनखजाताऽपि सहसा पुनाना त्रैलोक्यं स्मरहरशिरोभूषणमभूत् |

विवेकभ्रष्टां तां कविरयमुदारो विगणयन्न तस्याः स्वस्यैव प्रकटयति दीर्घामवनतिम्  || मुकुन्दराय

अर्थ

पायाच्या नखापासून उत्पन्न झाली तरी सुद्धा आपल्या गुणांच्या महात्म्यामुळे तिन्ही लोकांची [पाप नष्ट करून त्यांना] पवित्र करणारी [गंगामाता] भगवान शंकराच्या मस्तकावर भूषण होऊन राहिली. तिचा अविचारी असा अपमान करून या फार उदार [?] कवीने तिची नव्हेच तर स्वतःचीच अतिशय अधोगती दाखवून दिली आहे. [ थोड्याशा विनोदी छटेने हा श्लोक रचलेला आहे. भर्तृहरीबद्दल या कवीला चांगला आदर आहे. एखाद्या काव्याच सौंदर्य रसग्रहण करताना काही कवि विडंबनाचा मार्ग चोखाळतात.]

No comments: