१३०. नाभ्यस्ता भुवि वादिवृंददमनी विद्या विनीतोचिता ।
खङ्गाग्रैः करिकुंभपीठदलनैर्नाकं न नीतं यशः ॥
कांताकोमलपल्लवाधररसः पीतो न चन्द्रोदये ।
तारुण्यं गतमेव निष्फलमहो शून्यालये दीपवत् ॥॥
ह्या जगामध्ये नम्र माणसांना योग्य,[पर पक्षाच्या] पंडितांच्या समुदायाला पराजित करेल अशा विद्येचाही अभ्यास केला नाही, हत्तीदलांचा नाश तलवारीच्या धारेने करून स्वर्गात कीर्तीही पोहोचवली नाही, [रम्य]अशा संध्याकाळी पत्नीच्या कोमल अशा अधरांची माधुरी पण चाखली नाही तर, अरेरे! उजाड अशा घरामध्ये जळणार्या दिव्याप्रमाणे तारूण्य वायाच गेले.
हा श्लोक भर्तृहरीचा आहे.
No comments:
Post a Comment