भाषासु मुख्या मधुरा दिव्या गीर्वाण भारती।
तस्यां हि काव्यं मधुरं तस्मादपि सुभाषितम्॥

Sunday, May 20, 2012

६७४. समृद्धं सौभाग्यं सकलवसुधाया: किमपि तन्महैश्वर्यं लीलाजनितजगत: खण्डपरशो:|

श्रुतीनां सर्वस्वं सुकृतमथ मूर्तं सुमनसां सुधासौन्दर्यं ते सलिलमशिवं न: शमयतु || गङ्गालहरी पण्डितराज जगन्नाथ

अर्थ

सर्व पृथ्वीचे अवर्णनीय सौंदर्य असलेले; विशाल जग सहजपणे निर्माण करणाऱ्या शंकराचे मोठे ऐश्वर्य असलेले; वेदांचे सर्व सारच; देवांचे मूर्तिमंत पुण्यच; अमृताप्रमाणे मधुर असणारे तुझे पाणी आमचे अकल्याण दूर करो.

[पण्डितराजांनी लवंगीकेला पत्नी म्हणून स्वीकारल्यावर वाराणसीच्या सनातन्यांनी त्यांना वाळीत टाकले खूप वाईट वाटून ते गंगेवर आले पण त्यांना कोणी किनाऱ्याजवळ येऊ देईना तेंव्हा ते पत्नीसह घाटाच्या वर बावन पायऱ्या वर बसलेले असतात आणि गंगालहरीचा हा पहिला श्लोक म्हणतात तेंव्हा गंगा एक पायरी वर येते. अस एकेका श्लोकाबरोबर एक एक पायरी वर येऊन ते जिथे बसले होते तिथेच त्यांना अंघोळ घालून तिनी त्यांना पावन करून घेतले अशी आख्यायिका आहे.]

No comments: