भाषासु मुख्या मधुरा दिव्या गीर्वाण भारती।
तस्यां हि काव्यं मधुरं तस्मादपि सुभाषितम्॥

Saturday, July 7, 2012

७२४. रे रे चातक सावधानमनसा मित्र क्षणं श्रूयतामम्भोदा बहवो हि सन्ति गगने सर्वेऽपि नैतादृशा: |

केचिद्वृष्टिभिराद्रयन्ति धरणीं गर्जन्ति केचिद्वृथा यं यं पश्यसि तस्य तस्य पुरतो मा ब्रूहि दीनं वच:||चातकान्योक्ती

अर्थ

अरे मित्रा चातका; क्षणभर लक्षपूर्वक ऐक. आकाशात भरपूर ढग असतात, पण सगळेच [पाऊस पाडणारे] असे नसतात. काही [खूप] पाऊस पाडून पृथ्वीला चिंब भिजवतात, तर काही उगाचच गडगडाट करतात. तर तू जो जो दिसेल त्याच्यासमोर करुण याचना करू नकोस. [फक्त गडगडाट करणाऱ्या ढगांना काही पाझर फुटणार नाही आणि तुला पाणी मिळणार नाही.] [इथे चातक म्हणजे गरजू; पांढरे ढग = कंजूष श्रीमंत; काळे  ढग = दाता]

No comments: