७६. यथा काष्ठं च काष्ठं च समेयातां महोदधौ|
समेत्य च व्यपेयातां तद्वत् भूतसमागम:||
अर्थ
ज्याप्रमाणे एखाद लाकूड आणि दुसर लाकूड महासागरात जवळ येतात. जवळ आल्यावर [काही वेळाने] दूर जातात. [ते लाटा, भरती, ओहोटी वगैरे गोष्टींवर अवलंबून असते] त्याप्रमाणे प्राण्यांचा सहवास असतो. हा श्लोक महाभारतातील आहे.
2 comments:
हेच अप्रतिम काव्य रूपात गदिमा यांनी लिहिले " दोन ओंडक्यांची होते सागरात भेट. एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही गाठ ".
This Slok must be be out of Ramayana - This was said said by Lord Rama when Bharat comes to meet him and finally ends up taking Rama's Paduka to Ayodhya
Post a Comment