६५. तातेन लिखितं पुत्र पत्रं लिख ममाज्ञया |
न तेन लिखितं पत्रं पितुराज्ञा न लङघिता ||
अर्थ
वडिलांनी लिहिले 'बाळ, माझी आज्ञा आहे म्हणून पत्र लिही’. नम्र अशा त्याने पत्र लिहिले आणि वडिलांची आज्ञा मोडली नाही.
हा प्रहेलिका प्रकारचा श्लोक आहे. त्याने पत्र लिहिले नाही. वडिलांची आज्ञा मोडली नाही. नतेन एकत्र घेतला की नम्र अशा त्याने पत्र लिहिले असा अर्थ होतो.
No comments:
Post a Comment