भाषासु मुख्या मधुरा दिव्या गीर्वाण भारती।
तस्यां हि काव्यं मधुरं तस्मादपि सुभाषितम्॥

Monday, September 24, 2012

७९४. सर्वेऽपि नग्ना भुवनं विशन्ति चिन्तासु मग्ना इह सञ्चरन्ति |

नग्ना इतो हन्त कुतोऽपि यान्ति नातोऽधिकं तत्वविदो विदन्ति ||

अर्थ

तत्वज्ञानी लोकांना सर्वं श्रेष्ठ गोष्ट समजते ती ही की; या जगात प्रवेश करताना सर्वं जण नग्न असतात [बरोबर काही आणता येत नाही; आयुष्यभर कसल्या  ना कसल्या] चिंतेमध्ये बुडून जातात; आणि अरेरे! [एक दिवस] जाताना जिथे जातात तिथे नागडेच [बरोबर काही घेऊन जाता येत नाही] निघून जातात. यापेक्षा जास्त काही त्यांना माहित नसतं. [ खरं हीच गोष्ट सर्वात महत्वाची आहे. कितीही चांगली किंवा वाईट कृत्य करून अगदी रगड पैसा मिळवला तरी सगळं इथच सोडून, तत्वज्ञानी लोकांच्या भाषेत "नग्न" च जायचयं मग दुष्कृत्य कशाला करायची? सरळ मार्गाने जागून जेवढ जमेल तेवढ सुखं घ्याव.]

No comments: