भाषासु मुख्या मधुरा दिव्या गीर्वाण भारती।
तस्यां हि काव्यं मधुरं तस्मादपि सुभाषितम्॥

Friday, June 28, 2013

१०४९. कान्तं वक्ति कपोतिकाकुलतया नाथान्तकालोऽधुना व्याधोऽधो धृतचापसज्जितशरः श्येनः परिभ्राम्यति |


इत्थं सत्यहिना स दष्ट इषुणा श्येनोऽपि तेनाहतः तूर्णं तौ तु यमालयं प्रति गतौ दैवी विचित्रा गतिः ||

अर्थ

अगदी आर्तपणे कबुतराची मादी त्याला म्हणते; "स्वामी; आता आपलं संपल! [झाडाच्या] खाली पारधी धनुष्याला बाण जोडून सोडायला तयार झालायं. [म्हणून वर उडून जावं तर वर] ससाणा घिरट्या घालतोय"; पण असं घडलं असताना त्या [पारध्याला] साप चावला [आणि त्यामुळे त्याचा नेम चुकून त्या बाणाने] ससाणा पण मेला [आणि] लगेच [कबुतरांच्या ऐवजी] ते दोघेच यमाच्या घरी गेले नशिबाची चाल वेगळीच असते. [अगदी अटळ वाटत असलेला मृत्यू सुद्धा चुकला. म्हणून माणसानी आशा सोडू नये.]

No comments: