ह्या संस्कृत सुभाषितांचा अर्थ सौ. मंगला केळकर यांनी समजावून सांगितला आहे.
भाषासु मुख्या मधुरा दिव्या गीर्वाण भारती।
तस्यां हि काव्यं मधुरं तस्मादपि सुभाषितम्॥
तस्यां हि काव्यं मधुरं तस्मादपि सुभाषितम्॥
Friday, June 28, 2013
१०४९. कान्तं वक्ति कपोतिकाकुलतया नाथान्तकालोऽधुना व्याधोऽधो धृतचापसज्जितशरः श्येनः परिभ्राम्यति |
इत्थं सत्यहिना स दष्ट इषुणा श्येनोऽपि तेनाहतः तूर्णं तौ तु यमालयं प्रति गतौ दैवी विचित्रा गतिः ||
अर्थ
अगदी आर्तपणे कबुतराची मादी त्याला म्हणते; "स्वामी; आता आपलं संपल! [झाडाच्या] खाली पारधी धनुष्याला बाण जोडून सोडायला तयार झालायं. [म्हणून वर उडून जावं तर वर] ससाणा घिरट्या घालतोय"; पण असं घडलं असताना त्या [पारध्याला] साप चावला [आणि त्यामुळे त्याचा नेम चुकून त्या बाणाने] ससाणा पण मेला [आणि] लगेच [कबुतरांच्या ऐवजी] ते दोघेच यमाच्या घरी गेले नशिबाची चाल वेगळीच असते. [अगदी अटळ वाटत असलेला मृत्यू सुद्धा चुकला. म्हणून माणसानी आशा सोडू नये.]
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment