भाषासु मुख्या मधुरा दिव्या गीर्वाण भारती।
तस्यां हि काव्यं मधुरं तस्मादपि सुभाषितम्॥

Friday, January 17, 2014

११९१. तात त्वं निजकर्मणैव गमितः स्वर्गं यदि स्वस्ति ते ब्रूमस्त्वेकमिदं वधूहृतिकथां तातान्तिकं मा कृथाः |

रामोऽहं यदि तद्दिनैः कतिपयैर्व्रीडानमत्कन्धरः सार्धं बन्धुजनैः सुरेन्द्रविजयी वक्ता स्वयं रावणः ||

अर्थ

[जटायु आणि रावणाच्या युद्धानंतर जेंव्हा श्रीराम जटायूला भेटला तेंव्हा म्हणतो आहे; "अहो जटायु ताता; तुम्ही तर स्वतःच्या [पुण्याईने] स्वर्गात जाताय तुमचं कल्याण झालं आहेच, एक गोष्ट सांगायचीय सुनेच्या अपहरणाची बातमी [आमच्या] बाबांना [दशरथ महाराजांना] सांगू नका मी [पराक्रमी] राम आहे! इंद्रावर विजय मिळवणारा रावण सगळ्या लवाजम्यासह काही दिवसांनी येईल आणि शरमून लाजेनी मान खाली घालून तो स्वतःच [ही कथा] सांगेल.

No comments: