भाषासु मुख्या मधुरा दिव्या गीर्वाण भारती।
तस्यां हि काव्यं मधुरं तस्मादपि सुभाषितम्॥

Monday, April 5, 2010

२६. भोजनान्ते च किं पेयं जयन्तः कस्य वै सुतः ।

२६. भोजनान्ते च किं पेयं जयन्तः कस्य वै सुतः ।
कथं विष्णुपदं प्रोक्तं तक्रं शक्रस्य दुर्लभम् ॥

अर्थ

जेवण झाल्यावर कोणते पेय प्यावे (ताक)? जयन्त हा कोणाचा मुलगा आहे (इन्द्राचा)? विष्णुपद मिळण्यास कसे आहे (अतिशय अवघड)? ताक इन्द्राला (मिळण्यास) अतिशय अवघड.

टीप :-
समस्या प्रकारचा हा श्लोक आहे राजदरबारामध्ये कवींना चवथा चरण देऊन श्लोक रचणे अशी एक प्रकारे परीक्षा होती. ताक इन्द्राला (मिळण्यास) अतिशय अवघड (तक्रम शक्रस्य दुर्लभं) हे वाक्य अर्थपूर्ण करण्यासाठी पहिले तीन योग्य असे चरण कवीने रचले आहेत.

No comments: