भाषासु मुख्या मधुरा दिव्या गीर्वाण भारती।
तस्यां हि काव्यं मधुरं तस्मादपि सुभाषितम्॥

Monday, November 11, 2013

११३४. त्याज्यं न धैर्यं विधुरेऽपि काले धैर्यात्कदाचिद्गतिमाप्नुयात्सः |

यथा समुद्रेऽपि च पोतभङ्गे सांयात्रिको वाञ्छति तर्तुमेव ||

अर्थ

वाईट काळ आला तरी धीर सोडता कामा नये. त्या धीर धरण्यामुळे कदाचित त्याला मार्ग सापडू शकेल. जसं समुद्रात जहाज बुडल्यावर [मनात बळ धरून माणूस] पोहत पोहत [किनारा गाठण्याची] इच्छा करतो. [एखादवेळेस तो पोहून तीर गाठेल, पण घाबरला तर नक्की बुडून जाईल] म्हणून मन घट्ट करून संकटाला तोंड दिल पाहिजे.]

No comments: