भाषासु मुख्या मधुरा दिव्या गीर्वाण भारती।
तस्यां हि काव्यं मधुरं तस्मादपि सुभाषितम्॥

Sunday, November 24, 2013

११४९. भार्यावियोग: स्वजनापवादो ऋणस्य शेषं कृपणस्य सेवा |

दारिद्र्यकाले प्रियदर्शनं च विनाग्निना पञ्च दहन्ति कायम् ||

अर्थ

आग नसून देखील या पाच गोष्टी शरीराला [मनातून] जाळत राहतात - पत्नीचा [जोडीदाराचा] विरह, आपल्याच नातेवाईकांकडून  दूषण, कर्ज [फेडता न आल्यामुळे] राहिलेली शिल्लक, कंजूष माणसाची नोकरी आणि आपली [फार] गरिबी आलेली असताना आवडत्या माणसांची गाठभेट.

No comments: